जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
अर्ज लिंक 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
अर्ज लिंक 2 | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल (गट-क) ही 075 पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना २९२०० ते ९२३०० रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही सांविधिक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी + तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. हे आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा ही १९ वर्षापेक्षा कमी नसावे. खुल्या वर्गातील व्यक्तिसाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय व्यक्तिसाठी ४३ वर्षे असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर कार्यालय. तर परीक्षा शुल्क अराखीव (खुला) प्रवर्ग: १०००/-, राखीव प्रवर्ग: ९००/-, माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
या जाहिरातीमध्ये नमूद केलेली कनिष्ठ लेखापालपदे लेखा व कोषागारे, गट-क या प्रादेशिक संवर्गातील आहेत. या संवर्गात नियुक्त झालेले कर्मचारी व सध्या अस्तित्वात असलेल्या संवर्गातील कर्मचारी यांच्या सेवाज्येष्ठता, विभागीय परीक्षा व अन्य सेवाविषयक बाबीसंबंधी निर्गमित होणा-या शासन निर्णयातील तरतुदीनुसार बंधनकारक राहतील. शासकीय निमशासकीय सेवेतील कर्मचा-यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या नियुक्ती प्राधिका-यांना लेखी पूर्वसूचित करुन भरावेत. अशा अर्जदारास नियुक्तीच्या वेळेस त्याच्या पूर्वीच्या नियुक्ती प्राधिकान्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र परवानगी पत्र सादर करणे बंधनकारक राहील.
उमेदवाराने त्यास राखीव प्रवर्गाचा म्हणून विचारात घेण्याचा पर्याय स्विकारला आणि जर त्याने तो त्या प्रवर्गाचा असल्याबाबतची प्रमाणपत्रे सादर केली नाहीततर त्याने चुकीची माहिती दिली म्हणून त्यास अपात्र ठरविण्यात येईल आणि त्याचा खुल्या प्रवर्गासाठीही विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी दिलेली माहिती खरी आहे असे समजून त्यांची पात्रता निर्धारित करण्यात येईल. जर एखाद्या उमेदवाराने दिलेली माहिती खोटी, सदोष अथवा चुकीची आहे असे कोणत्याही टप्यावर आढळून आल्यास अशा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
एखाद्या अर्जदाराने त्यांची निवड करणेसाठी शासकीय अधिकान्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय अथवा अन्य प्रकाराने दवाव आणल्यास अथवा गैर प्रकाराचा अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येईल. अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी त्यांना कळविण्यात आलेल्या दिनांकास शैक्षणिक अर्हता, वय, अनुभव, अधिवास दाखला (Domicile Certificate) तसेच जातीचा दाखला, उपलब्ध असल्यास जातवैधता प्रमाणपत्र, अ.ज./अ.जा. उमेदवार अर्जदार वगळून इतरांसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसले बाबत (Non Creamylayer) इत्थायीप्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीकागदपत्रे पडताळणीवेळी पा कार्यालयास सादर करणे आवश्यक राहील, अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या सांक्षाकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येतील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटे किया चुकीची अथवा अपूर्ण आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: दि.३०.०१.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत आहे.